नमन त्या शूर विरांस २६/११

||ताज हॉटेल जळत होते || ||लाल रक्त गळत होते || ||खरे भक्त साळसकर || ||दूर शासना आळस कर || ||पुन्हा सव्वीस /अकरा नको|| ||कसाब सारखा छोकरा नको || ||नापाक पाकडे भामटे होते || ||शर्थीने लढणारे कामटे होते || ||तुकारामाने कमाल केली || ||कसाब पकडून धमाल केली || ||लढता -लढता शहीद झाले || ||तेंव्हा आम्हाला माहित झाले || ||नांगरे पाटलांचा विश्वास होता || ||ताज हॉटेलचा अभ्यास होता || ||आत शिरून आतंकी मारले || ||ओलीस धरलेले नागरिक तारले || ||नमन त्यांच्या कार्याला आहे || ||सलाम त्यांच्या शौर्याला आहे|| २६/११ च्या शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली ! संकलन :- सतिष गुरव कवी:- अज्ञात]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *