भिवंडीत मोहरमच्या मिरवणुकीत तणाव

ठाणे : भिवंडी येथे मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान तणाव निर्माण झाला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गायत्रीनगर परिसरातून मिरवणूक जात असताना नवरात्रीच्या कमानीतून `ताजिया’ जात नसल्याने ही कमान तोडण्यात आली. यावरुन दोन गटात वाद झाले आणि त्याचे पर्यावसान दगडफेकीत झाले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला असता त्यांनाही मारहाण झाल्याचे समजते. या गोंधळात संतप्त जमावाने पेट्रोल बॉम्ब फेकत पोलिसांची मिनीबस व एक दुचाकी जाळली. यात दोन पोलीस आणि एक पत्रकार जखमी झाला. तर पोलिसांच्या दोन ते तीन गाड्या फोडण्यात आल्या.यानंतर काही वेळात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारानंतर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (संकलन:- श्री. विवेकराव घारगे, ठाणे)]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *