अभय वर्तक यांना गोळ्या घाला ! डॉ. भारत पाटणकरांच्या विद्रोही मित्राची फेसबूकवर प्रतिक्रिया

डॉ. पाटणकर आणि खंडागळे यांना अटक करा – सनातन संस्थेची मागणी मुंबई – गेल्या काही दिवसांपासून कॉ. पानसरे आणि दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी मोर्चे, आंदोलने, निर्धार सभा आदींच्या माध्यमातून विषारी भाषणे देऊन सनातन संस्थेच्या विरोधात जनमत कलुषित करण्याचा प्रयत्न डॉ.भारत पाटणकर यांनी चालवला आहे. आतातर डॉ.पाटणकर यांच्या फेसबुक अकाऊंटवरून सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री.अभय वर्तक यांना गोळ्या घालण्याचे आवाहन त्यांच्याच विद्रोही मित्राने केले आहे. डॉ.पाटणकर यांनी २६ नोव्हेंबर यादिवशी फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केलेल्या बातमीला राम खंडागळे नावाच्या इसमाने मी तर म्हणतो वर्तकलाच गोळ्या घालाव्यात,जावू द्यात १० जण आत हसत हसत अशी पोस्ट २८ नोव्हेंबर २०१५ यादिवशी सकाळी केली आहे. त्यावर डॉ.पाटणकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता खंडागळे यांच्या आवाहनाला मूकसंमतीच दिली आहे. तसेच दिनांक २४ नोव्हेंबर २०१५ यादिवशी डॉ.पाटणकर यांनी स्वत:आमच्या आज्यांनी बैलांच्या शिंगांची बनवलेली उवा-लिखा काढायची फणी घेऊन दाभोळकर पानसर्‍यांच्या सनातनी खुन्यांना शोधण्याचे कोंबिंग ऑपरेशनचे काम ही सारी जनता करेल आणि उवा लिखांसारख्या उन्मादक सनातन्यांना बाहेर काढून जनताच त्यांना शिक्षा देईल, असा निर्धार डॉ.भारत पाटणकरांनी कोल्हापुरच्या दसरा चौकात व्यक्त केला. अशी सनातनच्या विरोधात चिथावणीखोर पोस्ट केली आहे. यातून डॉ.पाटणकर यांची अशा हिंसक कृत्यांना संमती असल्याचेच स्पष्ट होते. हे प्रकार निंदनीय असून निर्धार सभांच्या माध्यमातून स्वत:ला राज्यघटनेचे पायिक म्हणवणारे पाटणकर आणि त्यांचे पाठीराखे यांचा खरा चेहरा समोर आला आहे.या घटनेचा कोल्हापूरमधील हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन डॉ.पाटणकर आणि खंडागळे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.डॉ.पाटणकर आणि राम खंडागळे यांना त्वरित अटक करावी आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांना संरक्षण पुरवावे. त्याबरोबरच खंडागळे यांच्यासारख्या विद्रोहींना तडीपार करावे आणि डॉ.पाटणकर यांना कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी आणि भाषणबंदीही लागू करावी, अशी मागणीही सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच सनातनच्या साधकांना धमकावणे, सनातनच्या आश्रमांवर हल्ले करणे किंवा साधकांचे खून करणे यांसारख्या कृत्यांनी सनातनचे धर्मप्रसाराचे कार्य थांबेल,या भ्रमात पुरोगाम्यांनी राहू नये. श्री.वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, सनातन संस्था (संपर्क :८१०८०४४४४०)]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *