नवी मुंबईतील स्वच्छता अभियान अंतर्गत सुरू केलेली स्वच्छतागृहे बंद

नेरूळ, नवी मुंबई:- घनकचरा व्यवस्थापन मध्ये देशातून पहिला क्रमांक मनपाला मिळाला असतानाच स्वच्छता अभियान अंतर्गत सुरू केलेली स्वच्छतागृह बंद पडत आहेत. त्यामुळे असंख्य नागरिक रस्त्याच्या कडेला नैसर्गिक विधी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंद पडलेली शौचालय पुन्हा सुरू करावीत अशी मागणी नागरिक मोठ्या संख्येने करत आहेत.
मुंबई पुणे महामार्गावर नेरूळ येथील उड्डाणपुलाखाली मुंबईच्या दिशेने जाताना महिला व पुरुषांसाठी तीन स्वच्छतागृहे स्वच्छता अभियान अंतर्गत विनामूल्य सुरू केली आहेत. परंतु ही स्वच्छतागृहे गेल्या दोन महिन्या पासून बंद अवस्थेत आहेत. तसेच या स्वच्छतागृहांचे दरवाजाना टाळे लावल्यामुळे उघडता येत नाही. त्यामुळे या ठिकाणांहून मुंबईच्या दिशेने जाणारे नागरिक रस्त्याच्या कडेलाच उघड्यावर नैसर्गिक विधी उरकत आसल्याचे नवी मुंबई जिल्हा काँग्रेस चे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले. याठिकाणी नागरिकांची नेहमीच गर्दी असते. शेकडो नागरिक उघड्यावरच नैसर्गिक विधी उरकत असल्यामुळे दुर्गंधी पसरली असल्याचेही श्री. विरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.
अशीच परिस्थिती पूर्ण मनपाच्या हद्दीतील नेरुळ व बेलापूर परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची असल्याचे वास्तव आहे. काही स्वच्छतागृहात विद्युत दिवे बंद असणे, पाणी नसणे, अस्वच्छता असणे अशा प्रकारच्या समस्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे 
हागणदारीमुक्त मनपा परिसर करणे हे ध्येय होते. परंतू जशी स्वच्छता मोहीम संपली, तशी या स्वच्छतागृहांकडे असलेले मनपा आधिकाऱ्यांचे लक्ष दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये या स्वच्छतागृहावर खर्च करूनही काहीही फायदा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जर विनामूल्य स्वच्छतागृह मनपाला देणे जमत नसेल तर, दर आकारून नागरिकांना सुसज्ज स्वच्छतागृह द्यावेत अशीही मागणी नागरिक करत आहेत.
याबाबत मनपाचे उपायुक्त तुषार पवार यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत चौकशी करून कारवाई करतो असे सांगितले. अशी माहिती श्री. वीरेंद्र म्हात्रे यांनी युवा सह्याद्री शी बोलताना दिली.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *