कांदिवलीमध्ये महाअग्निप्रलय, कोट्यावधींचे आर्थिक नुकसान, दोघांचा मृत्यू

मुंबई:- कांदिवलीच्या समता नगर परिसरातील दामू नगरच्या झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. या आगीनंतर सिलेंडरचेही स्फोट होत आहे. त्यामुळे आग भडकत आहे. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक सिलेंडर्सचा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या भीषण स्फोटांमुळे परिसर हादरून गेला आहे. आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. अग्निशमनच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, युद्धपातळीवर आग विझवण्याचं काम सुरु आहे. [gallery columns="4" link="file" ids="876,877,878,879"] या आगीत अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या सुमारे १५० पर्यंत गेली असल्याचे म्हटले जाते. अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केलं आहे. या आगीच्या धुराचे लोट दूरवरून दिसत आहेत. त्यातच सिलेंडर स्फोटाच्या आवाजनेही परिसरात भयभीतता पसरली आहे. (युवा सह्याद्री, मुंबई प्रतिनिधी)]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *