लोकमान्य, सावरकर तुम्ही चुकलात की आम्ही चुकतोय?

हिंदू एक व्हावा व हिंदुत्वाासाठी प्राणाची संसाराची आहुती तुम्ही दिली ईथेच तुम्ही चुकलात. का म्हणून हिंदुत्वाचा ईतका पुळका सुटला होता तुम्हाला ? आज ज्या हिंदुंसाठी तुम्ही लढलात तेच हिंदु तुमची माफीविर , संडासविर, भटमान्य म्हणून हेटाळणी करतायेत ..त्यापेक्षा तुम्ही कदाचीत विशिष्ट जातीचा जातीयवाद केला असतात तर तुम्ही “भारतरत्नाचे ” मानकरी ठरले असतात ….तुमचे जागोजीगी पुतळे ऊभारले गेले असते .तुमच्या नावाने कोणत्यातरी मिलची जागा “‘बुक” झाली असती अलिशान स्मारक केले असते…..तुमच्या जयंती पुण्यतिथी मोठ्या धुमधड्याक्यात साजऱ्या केल्या गेल्या असत्या ….तुमच्या नावाने खडे फोडणारी सामान्य लोक व राजकारणी लोक तुमच्या नावाचा उदोउदो करताना थकली नसती……… आज ज्यांनी जातीयवाद केला विशिष्ट समाजासाठी लढलेत त्यांचा उदोउदो केला जातोय.त्याना महामानव, शिल्पकार,महात्मा तसेच भारताचे एकमेव उद्धारकर्ते म्हणून गौरविले जाते .त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर अखंड हिंदुस्थान ? पेटून उठतो..पण तुमची कितीही विटंबना झाली तरी तुमचीच लोकं साध ढुंकूनही पहायला तयार होत नाही …जे गर्वाने स्वतःला हिंदु म्हणवतात , ते साधा तुमचा वर्षोनुवर्ष खराब झालेला पुतळा , स्मारक सुद्धा साफ करत नाही….. ह्यासाठीच का तुम्ही हिंदुत्वासाठी लढला होतात का ? आणि आजची आमची पिढी देखील तिच चुक करताना दिसतेय…समस्त देश जातीयवाद व जातीयद्वेष करत असताना आम्ही मात्र केवळ आणि केवळ कट्टर ‘ हिंदु” म्हणून घेण्यातच धन्यता मानत असतो………. साधा हिंदु ब्राह्मण म्हणायला सुद्धा आम्ही तयार नसतो…….ब्राह्मण एकता म्हणाल तर ह्यांना तो जातीयवाद वाटतो.. मग तुमचाच कित्ता आम्ही देखील गिरवून “ब्राह्मण” नामषेश करण्याच्या मागे लागलो आहोत …अस वाटत.. सरते शेवटी अस वाटत की तुम्ही पुन्हा जन्माला याव व एका विशिष्ट जातीसाठीच लढाव…….व म्हणाव “”जातीअभिमान पाळणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो आम्ही पाळणारच….”” व कोणी जातीय द्वेष पसरवत असेल तर त्याला त्याच प्रकारे उत्तर देणार……… जय शिवराय..]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *